मोहन भागवतजी, तुम्ही सावरकरांच्या सोयीच्या विचारांना स्वीकारून बाकीच्या विचारांना मूठमाती देण्यास मागेपुढे पाहणार नाही, पण झाकलेलं कोंबडं आरवायचं राहत नाही…

भागवतजी, तसा मी आपला वैचारिक विरोधक आहे, पण मी तथागत बुद्ध, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महान पुरुषांचा डोळस अनुयायी, त्यांच्या विचारांचा पाईक आहे. या महापुरुषांनी विचाराला विचारानं, हिंसेला अहिंसेनं आणि अन्यायाला संवैधानिक मार्गानं उत्तर देण्याची परंपरा निर्माण केलेली आहे. सध्या देशाचे सत्ताकेंद्र आपल्या हातात असल्यामुळे प्रत्येकाला आपली दखल घ्यावी लागत आहे, मलादेखील .......

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......